🌱🌳🌴🥦*माझे आरोग्य ही माहिती वाचा आणि आपलं आरोग्य सांभाळा!…* 😀🌴🌳🌱🥦



                  🌿महागडे व्हि 'टॅमिन, कॅल्शियम आणि हाडांची झिज करणाऱ्या गोळ्या खाऊन हाड ठिसूळ करण्यापेक्षा पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी खाल्ल्या तर किती फायदा होईल याचा विचार जरूर करा आणि आजपासून पौष्टिक खाद्य सुरू करा.


☘️ *गूळ + खोबरे = बुद्धीवर्धक* 

(म्हणून बाप्पाचा नैवेद्य)

🍀 *गूळ + शेंगदाणे = शक्तिवर्धक* 

(म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)

🌱 *गूळ + फुटाणे = हिमोग्लोबींन वर्धक व रक्तशुद्धकारक* 

(म्हणून श्री बालाजीचा प्रसाद)

🌵 *तीळ + गूळ = कॅल्शियम, मॅग्नेशियम,आयर्न + झिंक + सेलेनियम* 

(हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,)

(यातले सेलेनियम - कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत करते)

 म्हणून संक्रांतीला गूळ पोळी

थंडीत बाजरीची तीळ लावलेली भाकरी  - शरीरात ऊर्जा (उष्णता) निर्माण करण्यासाठी

डिंकाचे लाडु किंवा राजगिरा लाडू

गुळतूप पोळी, शेगदाणा चिक्की किंवा भिजवलेले हरबरे - ताकत मिळण्यासाठी

                    उन्हाळ्यात नाचणीची अंबिल,ताक,मठ्ठा, लिंबु सरबत, आंबाडीचे व कोकम सरबत,सोलकडी इतर सरबते- शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील...

                  आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स,त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जात,

कारण पूर्वीची मुले आई वडिलांनी सांगितले म्हणून ऐकत. फार चिकित्सा करण्याच्या भानगडीत पडत नसत. आज तसे नाही. असंख्य प्रश्न विचारून भंडावून सोडतात. 

                *आणखी एक कारण म्हणजे हे जर शिकवले तर bornvita कोण पिणार?* 

                आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लान पीत नव्हते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? 

          *अहो एक आपला मावळा ५० शत्रूंशी एकटा लढायचा...* 

                कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा? 

                    शिवाय आपले पूर्वज एवढे हुशार होते, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते?

                   आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते, 

                *अहो वयाच्या १८-१९ वर्षी वागभट्टांचे संपूर्ण आयुर्वेद,आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान,  ज्ञानेश्वरी  तेव्हाच्या लोकांनी...* 

               कुठले टॉनिक पीत होते ते? स्वतःला प्रश्न विचारा, आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमिकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण शुद्ध... 


 *आपली संस्कृती हजारो वर्षांपासूनचं सायन्स मध्ये ऍडव्हान्स आहे* . 

 *आपल्याला या सर्वांची गरज नाही...* 

 *स्वदेशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा!!*


 **********************************

************************************************************************************

@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."

Share